बांगलादेशात ११ जणांना जलसमाधी, ५० बेपत्ता

ढाका – बांगलादेशमधील सुमनगंज जिल्ह्यातील सुरमा नदीमध्ये नाव उलटल्याने झालेल्या अपघातात ११ जणांना जलसमाधी मिळाली तर ५० हूनही अधिक जण बेपत्ता झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली.सोमवारी रात्री नऊच्या सुमारास बोटीला अपघात झाला. सकाळी तीन वाजेपर्यंत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नावेमध्ये १५ ते २० मुले आणि महिलांचा समावेश होता.नावेला आग लागल्याने हा अपघात झाल्याचे अपघाचतून बचावलेल्या नागरिकांनी सांगितले. सुमारे ४० ते ४५ लोकांना पोहून किना-यावर पोहोचण्यात यश मिळाले मात्र ५० हूनही अधिक जण अजूनही बेपत्ता असल्याची माहीती अधिका-यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 8 = eleven