
बाभुळगाव, दि. ४ – तब्बल दिड महिन्यांपासुन रिक्त असलेल्या बाभुळगाव पोलिस स्टेशनच्या ठाणेदारपदी महिपालसिंग चांदा रूजु झाले आहेत. त्याच प्रमाणे मुंबई येथुन बदलुन आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक हुलगे हे ही रूजु झाले आहेत. तर प्रभारी ठाणेदार समाधान धंदरे यांना यवतमाळ ग्रामिणची जबाबदारी देण्यात आली आहे.
दोन अधिकाºयांची नियुक्ती झाली असली तरी अद्याप पोलिस उपनिरिक्षकाची जागा रिक्त असुन बदलीवर गेलेल्या अनेक पोलिस कर्मचाºयांच्या जागी नवीन कर्मचारी आलेले नाहीत. त्यामुळे तोडक्या कर्मचाºयाच्या भरोशावर तालुक्यातील ९४ गावांचा कारभार चालत आहे.









