बालसुधारगृहातून मुले पळाली

download (1)
येरवडा – येरवडा येथील जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून (बालसुधारगृह) २ डिसेंबर रोजी पाच मुले पळून जाण्याची घटना ताजी असतानाच शनिवारी (२०डिसेंबर) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास व्यायाम खोलीतून पुन्हा एकदा पाच मुले पळून गेली. त्यातील एकाला केअर टेकरने पाठलाग करून पकडले; तर चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. बालसुधारगृहातून मुले पळून जाण्याची चालू वर्षातील ही चौथी घटना आहे.
विविध गुन्ह्यातील अल्पयवीन मुले सातत्याने पळून जाण्याच्या घटना घडूनही केंद्र सरकारकडून सुरक्षेसाठी कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. केंद्रातून पळून गेलेल्या मुलांपैकी तीन मुले ही पुण्यातील असून एक जण पनवेलचा आहे. मुले पळून गेली ती त्या दिवशी शनिवारी केंद्रावर नऊ केअर टेकर, तीन परीविक्षा अधिकारी, एक समुपदेशक आणि २७ मुले केंद्रात होती. डिसेंबर महिन्याच्या दोन तारखेला पाणी भरण्याचे निमित्त साधून रात्री साडे अकरा वाजच्या सुमारास सहा मुले सीमा भिंतीवरून उडी मारून पळून गेली होते. एकाच्या पायाला उडी मारल्यामुळे दुखापत झाल्याने त्याला केंद्रातील केअर टेकरने पकडले होते. पाच दिवसानंतर त्यातील तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिखली येथे पकडले; तर पंधरा दिवसांनी एकाला सोलापूर जिल्ह्यात पकडले होते. पळून गेलेल्यांपैकी अजूनही एक मुलगा पोलिसांना शोधता आलेला नाही.
शनिवारीही नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता ड्युटीवर असणारे केअरटेकर केंद्रातील काही मुलांना व्यायाम करण्यासाठी व्यायाम खोलीत घेऊन गेले. मुले खोलीत गेल्यावर केअर टेकरने दरवाजाला कडी लावून ते खोलीच्या मागे अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी गेले. काही वेळातच पाच मुले व्यायाम खोलीच्या मुख्य प्रवेश दराने पळू लागली. हे पाहून तेथील महिलांनी आरडाओरडा केला असता एका मुलाला पाठलाग करून पकडले; मात्र त्यातील चार जण पळून गेले. चार मुलांची विविध ठिकाणी आणि त्यांच्या घरी शोध घेऊन सुद्धा सापडली नसल्याने रात्री पोलिसांकडे मुले हरविल्याची तक्रार दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight − 8 =