
यवतमाळ – शेतकºयाला बोगस बियाणे देणाºया औरंगाबादच्या व्हर्जीन सिड प्रा. लि. च्या जनरल मॅनेजरविरुध्द पोलिसांनी दोन वर्षानंतर गुन्हा नोंद केला आहे. विष्णू जोशी असे या जनरल मॅनेजरचे नाव आहे. सण २०१२ मध्ये जिल्हा नियंत्रण निरीक्षक कार्यालयाचे सुभाष उलेमाले (५३) यांनी याबाबत दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. शेतकºयाने या कंंपीनचे कापूस बियाणे खरेदी केले होते. पेरणी केल्यानंतर ते उगवलेच नव्हते. त्यामुळे सदर बियाणे नित्कृष्ट असल्याबाबतची तक्रार शेतकºयाने केली होती. जिल्हा नियंत्रण निरीक्षक कार्यालयाने बियाण्याची तपासणी केली असता ते दोषपूर्ण आढळून आले. कंपीनने शेतकºयाची फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आल्यानंतर दोन वर्षानी पोलिसांनी जनरल मॅनेजरविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.









