
पटना – संपूर्ण देशात निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना बिहार येथील चंपारण जिल्ह्यातून गुरुवारी सुरक्षा रक्षकांनी पाच नक्षलवाद्यांना ताब्यात घेतले.
चंपारण जिल्ह्यातील वाडा बिशानपूर-राजेपूर या भागातून कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या पाच नक्षलवाद्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली. या पाचही नक्षलवाद्यांची ओळख पटली असून श्रीनारायण प्रसाद(४५), गणेश कुमार(२५), राजेश राम(१८), राजेश ठाकूर(२२) आणि दीपल राम(१८) अशी त्यांची नावे आहेत. या पाचही जणांकडून दोन पिस्तुले, काही युद्ध सामग्री आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बिहारमध्ये सात जागांवर मतदान होत आहे. दुपारपर्य़ंत येथे २९ टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे.









