बोगस बियाण्याची विक्री करणाºया औरंगाबादच्या मॅनेजरवर गुन्हा

2014-06-11~10ngp-19lakh_ns
यवतमाळ, दि. २३ – औरंगाबाद येथील सिड्स कंपनीने शेतकºयाला बोगस बियाणे विक्री केल्याचा प्रकार दिग्रस तालुक्यात नुकताच उघडकीस आला असताना, दारव्हा तालुक्यातील शेतकºयाला बोगस बियाणे देवून फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी जनरल मॅनेजर विष्णू जोशीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, शेकडो शेतकºयांची फसवणूक करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बियाण्याची निर्मिती केल्यानंतर त्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण विभागाला पाठवावे लागते. मात्र औरंगाबादच्या कंपनीने जिल्ह्यात विक्री केलेल्या कापूस बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यात आले नसल्याचे दारव्हा व दिग्रस तालुक्यात बियाणे न उगवल्याच्या प्रकारावरून समोर आले आहे. दिग्रस तालुक्यातील शेतकºयाने बियाण्याची पेरणी केल्यानंतर ते उगवलेच नसल्याची तक्रार केली होती. याप्रकरणात बियाणे दोषपूर्ण असल्याचे सिध्द झाल्यानंतर जनरल मॅनेजरविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान दारव्हा तालुक्यातील शेतकºयानेही बियाणे उगवले नसल्याची तक्रार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कार्यालयाकडे केली होती. तपासणीनंतर बियाणे बोगस असल्याचे उघड झाले असून, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष उलेमाले यांच्या तक्रारीवरुन दारव्हा पोलिसांनी याप्रकरणी ३ लाख ७ हजार २७० रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा नोंद केला आहे. जिल्ह्यात २०१२ मध्ये या कंपनीने शेकडो शेतकºयांना बोगस बियाणे देवून फसवणूक केल्याचे बोलले जात असून, याप्रकाराची चौकशी करून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 × six =