
यवतमाळ – विभागात भरारी पथकाद्वारे अमरावती व अकोला जिल्ह्यातील दोन बोगस रासायनिक खत विक्रेत्याविरूध्द कारवाही करून त्यांच्यावर पोलीसात गन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय
कृषी सहसंचालक कार्यालयाव्दारे देण्यात आली. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. दोन- तीन दिवसापुर्वी भरारी पथकाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील राजू वानखडे यांच्याकडे धाड टाकूण अंदाजे तीन लक्ष अठ्यात्तर रूपये किंमतीचा 17.38 मेट्रीक टन साठा जप्त केला. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यात मुर्तीजापूर येथील सुजीत प्रल्हाद धुत याचेकडुन 1.5 क्वींटल बोगस रासायनिक खत, व सोबत दस्तऐवज असलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत अंदाज चार लक्ष चौपन्न हजार इतकी आहे. या दोनही बोगस रासायनिक खत विक्रेत्याविरुध्द कृषी विभागाने पोलीसात गुन्हा दाखत केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.विभागामध्ये भरारी पथकाने 5498वितरक/विक्रेते पैकी 1012 विक्रेत्याकडे रासायनिक खत तपासनी
केली. यामध्ये अमरावती जिल्ह्यात उणिवा, त्रुटी आढळलेल्या दोन दुकांनदारांना विक्रीबंद करण्याचे आदेश देण्यात आले. बियाणे विक्री संदर्भातही भरारी पथकाने 1035 बियाणे विक्रेत्यांच्या दुकानाची तपासनी केली या
तपासणी मध्ये बुलडाणा जिल्ह्यात 60, अकोला जिल्ह्यात 7, वाशिम जिल्ह्यात 2, अमरावती जिल्ह्यात 6 तर
यवतमाळ जिल्ह्यात 47 बियाणे विक्रेत्यांकडे उणिवा व त्रृटी आढळल्यामुळे 122 विक्रेत्यांना बियाणे विक्रीबंद
ठेवण्याचे आदेश दिले असून अमरावती जिल्ह्यातील दोन बियाणे विक्री परवाने निलंबीत करण्यात आले आहेत.
किटकनाशकासंबंधी विभागात 4636 वितरक/विक्रेत्यांपैकी 305 दुकानाची तपसणी करण्यात आली. या तपासणीत अमरावती जिल्ह्यातील दोन दुकानात उणिव, त्रृटी आढळल्यामुळे त्यानाही विक्रीबंधीचे आदेश दिले
आहेत. तसेच अमरावती जिल्ह्यात बोगस किटक नाशकासंबंधी एका प्रकरणात 127 लिटर किटक नाशकाचा
साठा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजी किंमत 0.66 लक्ष रुपये इतकी असल्याचे कृषी विभागाने
कळविले आहे.









