भाजपने लोकशाहीची हत्या केली – काँग्रेस

Maha CM presser
मुंबई -आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकणा-या भाजपने सरकार वाचवण्यासाठी लोकशाहीची हत्या केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आवाजी मतदानामुळे भाजपला बहुमत मिळाले हे सिद्ध होत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
‘वाजपेयी सरकार एका मतामुळे पडले होते. फडणवीसांचे सरकार हे अल्पमतातील सरकार आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. तसेच विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान घेण्याची आमची मागणी विधानसभा अध्यक्षांनी जाणूनबुजून  फेटाळून लावल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आवाजी मतदानाच्या आधारे विश्वासदर्शक ठराव जिंकून भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे. अशा मतदानामुळे भाजप बहुमताने विजयी झाले हे सिद्ध होत नसल्याचे ते म्हणाले. तर ‘आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासातील काळा दिवस आहे.  आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जावा हे दुखद आहे. आम्ही या विरोधात नक्कीच पाऊल उचलू. यावरुन सरकारच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे,’ असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


five + 8 =