भाजप नेत्यांनी काढली राजीव गांधी यांची कुंडली

smruti-irani1Rajiv Gandhi
नवी दिल्ली , दि. १८  – भारतीय शास्त्रज्ञ-संशोधक विज्ञानाच्या मदतीने जग कवेत घेणाऱ्या नवनव्या मोहिमा आखत असताना देशातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये ग्रहगोल आणि शकुनअपशुकनांचे ‘ज्योतिषयुद्ध’ रंगले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांच्या ‘भविष्यवेध’ कार्यक्रमामुळे गोत्यात आलेल्या भाजपने आता काँग्रेसवर पलटवार केला आहे. पंडित नेहरू यांच्या ज्योतिषश्रद्धेचा पुरावा म्हणून भाजप नेत्यांनी राजीव गांधी यांची कुंडलीच काढली आहे.
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांनी काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषाला हात दाखवून भविष्य जाणून घेतल्यामुळं भाजपला टीकेचा सामना करावा लागला होता. काँग्रेसनं पंडित नेहरूंच्या विज्ञानवादाचा हवाला देत भाजपवर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसचा हा हल्ला भाजपने त्यांच्याच शस्त्राने परतावून लावला आहे. भाजपने बुधवारी एका पत्रकार परिषदेत पंडित नेहरू यांनी लिहिलेले पत्रच प्रसिद्ध केले. या पत्रातून नेहरू यांनी त्यांचे नातू व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जन्मकुंडली बनविण्याचा आग्रह धरल्याचे दिसत आहे.
राजीव गांधी यांच्या जन्मानंतर काही दिवसांनी म्हणजेच, २९ ऑगस्ट १९४४ रोजी नेहरू यांनी कृष्णा हाथीसिंग यांना लिहिलेल्या पत्रात राजीव यांची योग्य कुंडली बनविण्याचे निर्देश दिले होते. इंदिरा गांधी यांनाही त्यांनी कुंडली बनविण्यासाठी चांगल्या ज्योतिषाचा शोध घेण्यास सांगितलं होतं. तसं या पत्रात त्यांनी स्वत: नमूद केलं आहे. कुंडलीतील वेळ ही सौरवेळ असावी, सध्याची प्रचलित वेळ नसावी, असंही नेहरूंनी यात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत नेहरूंचं हे पत्र भाजपने काल मीडियाला दिलं. भाजपच्या या खेळीमुळं काँग्रेस तोंडघशी पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 6 = two