
यवतमाळ, दि. १७ – ‘आम्ही भारतीय लोक’ या वाक्याने भारतीयांना समर्पीत असलेले भारतीय संविधान. भारतीयांना सामाजिक, आर्थीक आणि राजकीय न्याय प्राप्त करून देणारी एक विचारधारा आहे. स्वतंत्रता, समानता व बंधूता याचाच खºया राष्टÑवादीची मांडणी करणारे संविधान प्रत्येक माणसाला सन्मानासह प्रत्येकाला जगण्याचा हक्क प्रदान करते. खाजगीकर, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आज जिवघेण्या स्पर्धे ही सर्वासामान्य न्भारतीयांच्या आशाआकांक्षांना प्रज्वलीत करणारा भारतीयांचा एकमेव धर्मगं्रथ म्हणजे भारतीय संविधान होय. संविधान हे केवळ पुस्तक नसून भारतीयांची जीवन जगण्याची संस्कृती आहे असे प्रतिपादन संविधान विश्लेषक प्रा. डॉ. निलकंथक यांनी केले.
कोरेगाव दिनाचे औचित्या साधून ‘बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिवेषात परिवेषात भारतीय संविधान’ या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘स्वरधारा’ ह्या कार्यक्रमात यशवंत पाटील, जया तेलंग, निलश्वज कांबळे, धनराज गायकवाड, महादेव कांबळे, उदय कांबळे, सोनवणे, दिनेश डोंगरे, उत्तर थुल, युवराज डोमे, वावरे आदी कलावंतानी जगदिश भगत यांच्या निवेदनात आपली क्रांतीगीत सादर केलीत. कार्यक्रमाच्या आयोजनामधील भूमिका संजय गुजर यांनी विषद केली. कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे तर आभार सुनिल मालके यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सिध्दार्थ भगत, धम्मा कांबळे, नामदेव थूल, प्रा. शैलेश तेलंग, केशव भागवत, वनमाला राऊत, आनंद उमरे, सुर्यवंशी, सुरेश मेश्राम, हरिदास, राऊत, सातपूते, उके, संतोष गुजर, यु.पी. बन्सोडे, इंगोले, प्रकाश दातार, डॉ. किशोर बन्सोड, अशोक ताकसांडे, अश्विन खरतडे, तथा समता सैनिक दल, कास्ट्राईब कर्मचारी वैद्यकीय संघटना, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ या सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्या नागरिकांची उपस्थिती होती.









