भिषण अपघातात तीन ठार

SAM_8989
यवतमाळ , दि. २७ – दारव्हा-कारंजा मार्गावरील सावंगी (रेल्वे) येथे स्विफ्ट कार आणि टाटा एस वाहनात आज सोमवारला दुपारी ३.४० वाजता समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात तीन जण ठार तर दोन गंभीर जखमी झाले.
कारंजा कडून दारव्हा कडे येणारी एमएच २९ एडी ६३०४ क्रमांकाच्या कारला विरुद्ध दिशेने येणाºया एमएच २९ टी ६८४७ क्रमांकाच्या टाटा एस वाहनाने समोरासमोर धडक दिली. कार मधील केशव इहरे, सुभाष इहरे आणि शेषराव इहरे सर्व रा. डेहणी ता. दिग्रस यांना जखमी अवस्थेत कारंजा येथील नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. अपघाताता सायखेडा निवासी विठ्ठल बागल व दारव्हा निवासी राज ठाकूर गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना यवतमाळ येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले. अपघातातील तीनही मृतक एकाच परिवारातीलअसून सोयरिक जोडण्यासाठी कारंजाला गेले होते. धडक इतकी जोरदार होती की टाटा एस वाहन अडकलेल्या जखमींना गावकºयांनी वाहनाचे दार कुºहाडिने तोडून बाहेर काढले. मृतक सुभाष इहरे दिग्रस स्टेट बँकेत वरिष्ठ रोखपाल पदावर कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचली आणि पंचनामा करून पूढील कारवाई सुरू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 3 = one