
नागपूर – भू-संपादन कायद्यावरून केंद्र सरकारविरुद्ध राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विदर्भातून लाँगमार्च काढण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. अमरावती जिल्ह्यातून या लाँगमार्चला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
भूसंपादन कायद्याविरुद्ध राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नव्या दमाने उतरणार आहे. भूसंपादन कायद्यासाठी एकमत करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गडकरींवर सोपवली आहे. त्यानंतर गडकरी लगेच कामालाही लागले. काँग्रेसनेही त्यांना शह देण्यासाठी भूसंपादन कायद्याविरोधात लाँगमार्चसाठी विदर्भाची निवड केली आहे. गांधी त्याकरीता नागपूर-अमरावतीला येणार असल्याची माहितीही काँग्रेस सूत्रांकडून मिळाली. दुष्काळ, गारपीट यामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत असताना भूसंपादन विधेयकामुळे तो देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे मोदी सराकर कसे उद्योजकधार्जिणे आणि शेतकरीविरोधी आहेत. हे सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लाँगमार्च काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे.









