मध्यान्ह भोजनातून १६० विद्यार्थ्यांना विषबाधा

1_july_p_2
यवतमाळ – विद्यार्थ्यांच्या शारीरीक व बौद्घीक विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेच्या आहारातून इयत्ता पहिले ते आठवीत शिकणाºया तब्बल १६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी उमरखेड तालुक्यातील मुरली या गावी घडली. विषबाधेच्या या गंभीर प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळेतील नियोजनशुन्य कारभारही चव्हाट्यावर आला आहे.
उन्हाळी सुट्टया संपल्यानंतर २६ जून रोजी शाळेचा पहिला ठोका पडताच जिल्ह्यातील शाळा चिमुकल्यांच्या किलबीलाटाने दणाणून गेल्या. शाळेचे सत्र नियमित सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजन देणेही सुरु झाले. त्याचप्रकारे आज मंगळवारी मुरली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत १९० पैकी १६० विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार देण्यात आला. काही वेळाने आहार सेवन करणाºया मुलांना डोळेदुखी, मळमळ व उलट्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले. आज आहारात विद्यार्थ्यांना मटकी द्यायची असल्याने तीला मोड यावी म्हणून पाण्यात भिजवुन ठेवण्यात आले होते. त्यात पाल सदृश प्राणी पडून ही विषबाधा झाल्याचे पालकांमध्ये बोलल्या जात आहे. मुलांना वाढता त्रास पाहून काही पालकांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहीका बोलविण्यात आली. सद्यास्थितीत विद्यार्थ्यांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 × four =