
यवतमाळ -केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले असून, शेतकºयांना दिलेल्या वचननाम्याची अद्यापही पुर्तता झाली नसल्याने शेतकºयांच्या न्याय मागण्यांसाठी मनसेने आज शुक्रवारी शहरात गोठोडे मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाकचेरीवर धडकलेल्या या मोर्चातील पदाधिकाºयांची निवेदनावरून पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्याने मोर्चेकरांनी जिल्हाधिकाºयांच्या कक्षासमोर ठिय्या मांडून संताप व्यक्त केला.
भाजपने सत्तेवर आल्यानंतर शेतकºयांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करून शेतकºयांना दिलासा देण्याची गरज होती. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजप शेतकºयांच्या हक्काच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, कृषीपंपाचे वीज बिल माफी, उत्पादन खर्चावर आधारीत भाव, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पुर्नवसन, सिंचनाची सुविधा आदी मागण्यांना घेऊन मनसेच्यावतीने नेताजी चौकातून गोठोडे मोर्चा काढण्यात आला. शहरातून मार्गक्रमन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचलेल्या गाठोडे मोर्चाला निवेदन देण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला. यावेळी मोर्चेकरी पोलिसांना धक्काबुक्की करीत निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या कक्षात शिरले. मागणीचे निवेदन व कापसाचे गाठोडे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. निवेदन देण्यासाठी पोलिसांनी अडवणूक केल्यामुळे संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोर ठिय्या मांडून निषेध नोंदविला. यावेळी अनिल हमदापूरे, संजय देठे, विकास पवार, संगिता घोडमारे, राजू बावणे, सुधाकर झोटींग, देवा शिवरामवार, अंजु चिल्लोकर, छबु आठवले, शंकर मोकळे, प्रवीण मोगरे, धनराज चव्हाण आदी उपस्थित होते.









