महसूली गावात टंचाईसदृष्य परिस्थिती जाहिर

download (3)

यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यात सन 2014-15 या वर्षातील खरीप हंगामातील अंतीम पैसेवारी 50 पैसे वा त्यापेक्षा कमी असलेल्या 2050 महसूली गावात टंचाई सदृष्य परिस्थिती जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक गावे पुसद तालुक्यतील आहे. या गावांमध्ये नियमाप्रमाणे सवलती लागू करण्यात येणार आहे.
टंचाई सदृष्य जाहिर करण्यात आलेली तालुकानिहाय गावांची संख्या अशी आहे. यवतमाळ तालुक्यातील 136 गावे टंचाई सदृष्य आहे. कळंब तालुका 141, बाभुळगाव 127, आर्णी 106, दारव्हा 146, दिग्रस 181, नेर 121, पुसद 187, उमरखेड 136, महागाव 114, केळापूर 131, घाटंजी 107, राळेगाव 132, वणी 160, मारेगाव 108 तर झरी जामणी तालुक्यातील 117 गावांचा समावेश आहे. टंचाई सदृष्य घोषित गावांमध्ये 8 प्रकारच्या सुविधा शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात जमीण महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीत स्थगिती, विज बिलात 33.5 टक्के इतकी सूट, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामाच्या निकाषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची विज जोडणी खंडीत न करणे यासारख्या सवलतीचा समावेश असल्योच जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 + three =