महागाई भत्त्यात १०० टक्के वाढ

नवी दिल्ली- केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात १०० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला. सरकारच्या या निर्णयाचा ५० लाख कर्मचारी आणि ३० लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.गेल्यावर्षी जुलै २०१३ मध्ये महागाई भत्ता दहा टक्क्याने वाढवून ९० टक्के करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी या भत्त्यामध्ये आणखी १० टक्क्यांनी वाढ करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या महागाई भत्त्यामधील ही वाढ एक जानेवारी २०१४ पासून लागू होणार असल्याचेही सरकारने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six × 9 =