महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना-भाजप वेगळे होतील – शरद पवार

NCP press conference
मुंबई – सरकारमध्ये एकत्र सहभागी असूनही, परस्परांना जागा दाखवण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना-भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी वेगळे होतील अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना हे भाकीत त्यांनी वर्तवल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विरोधाबद्दल बोलताना पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांची भूमिका व्यक्तीगत असून, त्याच्याशी आपण सहमत नसल्याच त्यांनी स्पष्ट केल.जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल बाबासाहेब पुरंदरे गप्प ? असा सवाल टि्वटरवरुन विचारत आव्हाड यांनी बाबासाहेबांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यावर आक्षेप घेतला होता. शिवसेना-भाजपा युतीबद्दल शरद पवारांनी व्यक्त केलेल्या मताला महत्व आहे. कारण शिवसेनेचे सत्तेत असूनही वर्तन विरोधकांसारखे आहे.भाजपाही शिवसेनेला जागा दाखवून देण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबईमध्ये दोन्ही पक्षांच्या आमदारांचे संख्याबळ जवळपास समसमान आहे. मागच्या महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना सर्वाधिक जागा लढवीत होती तर, भाजपाला कमी जागा मिळत होत्या.मात्र आता आमदार संख्या समसमान असल्याने भाजपा यावेळी दुय्यम भूमिका स्वीकारणार नाही असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाला स्थानिक स्तरावर विस्तारण्याची जास्त संधी आहे. त्यामुळे शरद पवार यांनी व्यक्त केलेले हे मत महत्वपूर्ण ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 + two =