महिलांमुळे एकात्मतेची भावना रुजली – विधानाभा उपाध्यक्ष आ. पुरके

यवतमाळ – पुरुषाच्या तुलनेत महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ५४ टक्के असून सर्वच आघाड्यावर महिलांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. बचत गटासारख्या चळवळीतून महिला एकत्रीत झाल्या व त्यामुळेच त्याच्यासह समाजातही एकात्मतेची भावना रुजल्याचे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष आ. प्रा. वसंत पुरके यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजीत महिला मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, इंदिरा गांधीनी समर्थपणे देश हिताचे त्या काळी निर्णय घेतले. त्यांच्या कल्पनेतुन पुढे आलेल्या योजनामुळेच ग्रामीण भागाची प्रगती झाली. आता ही महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणेच लोकसभा-विधानसभेतही ५० टक्के आरक्षण देण्याचा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे समाजातील चांगल्या गोष्टींना वाव मिळावा म्हणून महिलांनी अधिक प्रमाणात राजकीय सहभाग घेण्याची गरजही त्यांनी बोलुन दाखविली. आपल्या मुलांना संस्काराचे धडे दिल्यास मराठी माणसाचा टक्का आयएएस, आयपिएस, आयएफएस सारख्या प्रशासन सेवेत वाढेल असेही ते म्हणाले.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यात महिलांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. वामन कासावार, माजी मंत्री संजय देशमुख, देवानंद पवार, राहुल ठाकरे, महाराष्टÑ प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कमल व्यवहारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six + = 14