
यवतमाळ, दि. २९ – महिला शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील बोराटी येथे घडली. सुनिता पवार (३०) असे मृतक महिलेचे नाव आहे. महिला शेतकºयाकडे पाच एकर शेती होती. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने नापिकीचा सामना करावा लागला. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फे डायचे या चिंतेत महिलेने आत्महत्या केली असून, महिलेवर ५० हजार रूपयांचे कर्ज आहे.









