
माहुर (नांदेड) दि. २१ – जे वकळ एकाते त्यावर विश्वास ठेऊ नका. जे केवळ धर्मग्रंथात लिहीले आहे. म्हणून त्यावर विश्वार ठेऊ नका जे बुध्दीला पटते त्यावर विश्वास ठेवा. बुध्दीप्रमाणे वाद हीच बुद्घधम्माची शिकवण आहे असे प्रतिपादन समता परिषदेचे अध्यक्ष अप्पाराव मैंद यांनी केले.
बौद्घभूमि परिसर माहुर येथे आज शनिवारी २१ मार्च रोजी आयोजीत पाचव्या धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सकाळी भदंत बी. अश्वजीत यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मफेरी काढण्यात आली. पंचशिल धम्मध्वारोहनानंतर कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुरूवातीला वामनदादा कर्डक संगीत अकादमी किनवट द्वारा प्रा. सुरेश पाटील यांनी अभिवादन गित सादर केले. उद्घाटन समारंभाच्या प्रास्तविकातून गोकुलदार वंजारे यांनी धम्माचे आचरण साधे मानव जिवन जगण्यास अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. तर जेतवनचे सदस्य प्राचार्य के.व्ही. मुनेश्वर यांनी बौद्घ धम्म दु:ख निवारण्याचा मार्ग असल्याचे सागितले. माहुरचे माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे यांनी बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी वाचण संस्कृतीवर भर देऊन प्रबोधनात्मक कार्यक्रमात उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोळकर , कॉ. गोविंद पानसरे, शाहीर साबळे यांना आदरांजलीचा ठराव पारीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन उत्तम कानिंदे यांनी तर आभार श्रीरंग जगताप यांनी मानले. सयोजन व्ही.के. सिरसाट यांनी केले होते. यावेळी जयवंत पाटील, नगर परिषद सभापती राज गंधेवाड, धम्म परिषदेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, निमंत्रक गोविंद मगरे, स्वागताध्यक्ष मनोज किर्तने, मिलींद सर्पे उपस्थित होते. यावेळी भदंत प्रा. सुमेथबोधी महाथेरो, भदंत विपशी स्थवीर, भदंत धम्मवश थेरो, भदंत अश्वजीत, भदंत राहुल आचार्य यांनी धम्मदेसना दिली. संचालन सुरेश पाटील यांनी तर आभार प्रल्हाद भवरे यांनी मानले.









