
मुंबई- मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने (आयबी) वर्तवली असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. हा दहशतवादी हल्ला २८ जानेवारीपूर्वी होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे.
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. मंगळवारी सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गर्दी असते, ती संधी साधूनच हा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.जमात-ऊल-दावा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या चार दहशतवादी संघटना देशात सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओदिशात आपले बस्तान मांडले आहे. मुंबईत हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी अब्दुल्ला-अल-कुरेशी, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबीद झेमन आणि समशेर या चार दहशतवाद्यांवर सोपवण्यात आली आहे.









