
यवतमाळ – धर्मांतराचा कार्यकारणभाव विशद करून कोट्यवधी अस्पृश्यांना उर्जा देणाºया मुंबई ईलाखा परिषदेतील प्रेरणादायी व क्रांतीकारी, ‘मुक्ती कोण पथे’ या प्रबोधन उच्चाराला अमृत महोत्सवाचे आयोजन २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे केले आहे. नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नाग) च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यानिमित्ताने उर्जा दिनाचे कार्यक्रम होणार आहे.
३१ मे १९३६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई इलाखा महार परिषद आयोजित करून आपल्या ओजस्वी व मुलगामी भाषणातून संभ्रमित अस्पृश्यांना नवी दिशा दिली. या परिषदेमुळेच लाखो अस्पृश्य धर्मांतरासाठी कटिबध्द झालेत. त्याचबरोबर १५ मे १९३६ रोजी अॅनहिलेशन आॅफ कास्ट हे लाहोर येथे जातपात तोडक मंडळाच्या कार्यक्रमात ऐनवेळेवर रद्द झालेले भाषण पुस्तक रुपाने बाहेर आले आणि या गं्रथाने समस्त भारतीयांना जाती व जाती निर्मूलनाचे स्वरूप व सिध्दांत समजावून सांगितले. त्या ग्रंथाचाही अमृत महोत्सवी गौरव या निमित्ताने या चिंतनपर कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमात हिंगणघाटचे आंबेडकरी विचारवंत अशोक बुरबुरे, बुद्धप्रिय थूल , प्रा. अनिल काळबांडे इत्यादींचा सहभाग असणार आहे. या निमित्ताने धम्मप्रसार करणाºया मान्यवरांचा तसेच अनेकविध महिला व पुरूष मंडळांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. यामध्ये संध्या सराटकर, प्रा. अशोक इंगळे , शेषराव पिराजी धांडे, डॉ. गणेश टाले, अशोककुमार दवणे, बळी खैरे, संदेश ढोले, माधव सरकुंडे, दशरथ मडावी, मन्सुर एजाज जोश, संघमित्रा टेंभूर्णे, सिद्धार्थ भगत यांचा सहभाग असणार आहे. मुक्ती कोण पथे आणि जाती निर्मूलन या दोन उर्जस्वल भाषणाच्या अनुषंगाने चळवळीतील उर्जादायी व्यक्तीमत्वाला ‘भीम उर्जा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असे नाग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी कळविले.









