मुजफ्फरनगर दंगलीला राज्य सरकारच जबाबदार: सुप्रीम कोर्ट

supreme-court

नवी दिल्ली –  उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर दंगलीसाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनच जबाबदार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. तसे असले तरी दंगलीप्रकरणी राज्य सरकारकडून करण्यात आलेला तपास पुरेसा आहे. तसेच सीबीआय तपासाची आणि एसआयटी चौकशी करण्याचीही आवश्यकता नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेला तपास पुरेसा आहे, असेही स्पष्ट झाले आहे.
दंगलीला सुरुवात झाली त्या काळात राज्य सरकारकडून कडक पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळेच दंगल आणखी पसरली, असे कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे. दंगलीतील पीडितांना सुरक्षा देण्यात आली पाहिजे, असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत. जनतेच्या प्रचंड विरोधामुळे आम्ही पहिल्या काही घटनांमध्ये आरोपींना अटक करू शकलो नाही, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र हा तर्क कोर्टाने सरळ अमान्य करत राज्य सरकार ती परिस्थिती हाताळण्यास असक्षम ठरल्याचे स्पष्ट म्हटले आहे. मुजफ्फरनगर येथे २०१३ मध्ये उसळलेल्या दंगलीत ५० जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उत्तर प्रदेश राज्य सरकार विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच या दंगलींची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 + = seven