
सोलापूर – पाचवी मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी जिल्ह्यातील मंगळवेढयामध्ये घडली.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावामध्ये रहाणा-या बाजीराव वाघमारेने पाचवीही मुलगी झाली म्हणून पत्नीची विळयाने गळा चिरुन हत्या केली. बाजीरावला पहिल्या चार मुली आहेत पण वंशाला दिवा हवा हा त्याचा अट्टाहास कायम होता. पत्नी पाचव्यांदा गर्भवती राहिली तेव्हा त्याला मुलगा होईल अशी आशा होता. पण पत्नीने पाचव्यांदाही कन्यारत्नाला जन्म दिल्याने चिडलेल्या बाजीरावने पत्नीची विळयाने हत्या केली. बाजीराव हा मजुरीचे काम करतो. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.









