सायतखर्डा येथील घटना, मृतक वर्धा जिल्ह्यातील
यवतमाळ – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलीला फाशी देऊन पित्याने आत्महत्या केली. ही दुदैवी घटना आज मंगळवारी दुपारी १२ वाजता घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथे घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
अजय तुकाराम ढवळे (३५), अनुष्का अजय ढवळे (वय ५, रा. नाचनगाव ता. पुलगाव जि. वर्धा ) असे मृतांचे नाव आहे. अजयची पत्नी घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा आरोग्य उपकेंद्रात परिचारीका म्हणून कार्यरत असून तेथेच शासकीय निवासस्थानी राहत होती. गावातील रुग्ण तिच्याकडे औषधोपचारासाठी येत होते. मृतक हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी नेहमीच वाद करीत होता. गत दोन दिवसापूर्वी नाचणगाव येथून अजय सायतखर्डा येथे आल्यानंतर पत्नीसोबत वाद केला. आज सकाळी त्याची पत्नी गावात हत्तीरोगाच्या गोळ््याचे वाटप करण्याठी गेली असता, घरी कुणी नसल्याचे पाहून रागाच्या भरात अजयने मुलीचा दोरीने गळा आवळून जागीच ठार मारले. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आपले जीवन संपविले.पत्नी दुपारी घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, पारव्याचे ठाणेदार पंजाब वंजारी, जमादार दिगांबर अलोने, रमेश एळमे, गणेश भोसे, रमेश डोंगरे, गजानन खांदवे यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे. यावेळी मृतकाने लिहुन ठेवलेली चिठ्ठीही पोलिसांच्या हाती लागली. त्यामध्ये मी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे जगू शकत नाही म्हणून आत्महत्या करीत आहो, असे नमूद असल्याची माहिती पोलीस सू्त्रांनी दिली. मुलीला फाशी देऊन पित्याची आत्महत्या
सायतखर्डा येथील घटना, मृतक वर्धा जिल्ह्यातील
यवतमाळ
दि. १० (स्थानिक प्रतिनिधी)
…………………………
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलीला फाशी देऊन पित्याने आत्महत्या केली. ही दुदैवी घटना आज मंगळवारी दुपारी १२ वाजता घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथे घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
अजय तुकाराम ढवळे (३५), अनुष्का अजय ढवळे (वय ५, रा. नाचनगाव ता. पुलगाव जि. वर्धा ) असे मृतांचे नाव आहे. अजयची पत्नी घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा आरोग्य उपकेंद्रात परिचारीका म्हणून कार्यरत असून तेथेच शासकीय निवासस्थानी राहत होती. गावातील रुग्ण तिच्याकडे औषधोपचारासाठी येत होते. मृतक हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी नेहमीच वाद करीत होता. गत दोन दिवसापूर्वी नाचणगाव येथून अजय सायतखर्डा येथे आल्यानंतर पत्नीसोबत वाद केला. आज सकाळी त्याची पत्नी गावात हत्तीरोगाच्या गोळ््याचे वाटप करण्याठी गेली असता, घरी कुणी नसल्याचे पाहून रागाच्या भरात अजयने मुलीचा दोरीने गळा आवळून जागीच ठार मारले. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आपले जीवन संपविले.पत्नी दुपारी घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, पारव्याचे ठाणेदार पंजाब वंजारी, जमादार दिगांबर अलोने, रमेश एळमे, गणेश भोसे, रमेश डोंगरे, गजानन खांदवे यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे. यावेळी मृतकाने लिहुन ठेवलेली चिठ्ठीही पोलिसांच्या हाती लागली. त्यामध्ये मी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे जगू शकत नाही म्हणून आत्महत्या करीत आहो, असे नमूद असल्याची माहिती पोलीस सू्त्रांनी दिली.









