मोदींना ‘मानवी बॉम्ब’चा धोका

Narendra
नवी दिल्ली – देशातील सध्याचे सर्वाधिक चर्चेतील नेते व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर मानवी बॉम्बचा हल्ला होण्याची भीती गुप्तचर अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून लालकृष्ण आडवाणी, राहुल गांधी, मुलायमसिंह, केजरीवाल यांच्यासह काही नेत्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचेही आदेश दिले आहेत.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर १९९१ साली झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती करून देशातील धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. त्यासाठी निवडणूक काळात प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर वाराणसी किंवा वडोदऱ्यामध्ये हल्ला होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र व यूपीतील सुरक्षा संस्थांना खास खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दिल्लीतील शास्त्री पार्क येथे २६ मार्च रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्कापासून जवळ असलेल्या सीलमपूर, जाफराबाद या वसाहतींमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. ही सभा म्हणजे भाजपचा मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. तर मुस्लिमबहुल भागातील या सभेचा फायदा घेऊन दहशतवादी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे.’मोस्ट वॉण्टेड’ दहशतवादी वकास व त्याचे साथीदार हाती लागल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला असला तरी धोका अजूनही कायम आहे. त्यांचे काही साथीदार अद्यापही फरार असून लश्कर व हरकत उलच्या दहशतवाद्यांमध्ये संभाषण झाल्याची कुणकुणही गुप्तचर अधिकाऱ्यांना लागली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 + seven =