
कोलकाता- नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हे एक स्वप्न असल्याचे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीनंतर देशात तिस-या आघाडीचे सरकार येईल असा विश्वासही त्यांनी केला.
मोदींचे पंतप्रधानपद ही केवळ एक स्वप्न असल्याने अशा कल्पित प्रश्नांची उत्तरे देण्याची मला गरज वाटत नसल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले. एखाद्या श्रींमत घरात वाढलेल्या आणि विशेष काळजी घेतलेल्या मुलाशी आणि कुपोषित, दुर्लक्षित मुलाची ज्याप्रमाणे तुलना होऊ शकत नाही तसेच पश्चिम बंगाल आणि गुजरात यांची तुलना होऊ शकत नाही असेही त्या म्हणाल्या. लोकसभा निडणुकीच्या प्रचार सभेतही अनेक वेळा ममता बॅनर्जी यांनी मोदींसह गुजरातच्या विकासावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. गुजरातच्या विकासाशी आपल्याला तुलना करायची नाही. मात्र सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आधीच गुजरातचा विकास झाला होता. उलट मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर विकास घटल्याचे ममता यांनी सांगितले. मोदींच्या गुजरात मॉडेलवर टीका करताना त्यांनी गुजरातच्या जनतेवर आपले प्रेम असल्याचे स्पष्ट केले. लोकसंख्या आणि संधी याचा विचार करता गुजरातककडे १९ बंदरे आहेत. तर पश्चिम बंगालकडे केवळ दोन आहेत. याचा विचार करता पश्चिम बंगालचे मॉडल अधिक चांगले असल्याचे त्या म्हणाल्या.









