यवतमाळात लवकरच शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा – पालकमंत्री राठोड

unnamed
जिल्हाधिकारी कार्यालयात शिव जयंती साजरी
यवतमाळ, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रत्येकाने प्रेरणा घ्यावे, असे आहे. त्यांच्या कार्याची आठवण सर्वांनाच व्हावी तसेच यवतमाळकर जनतेची असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी लवकरच महाराजांचा आश्वारूढ पुतळा यवतमाळात साकारणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.कडू, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मोहन जोशी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, सहाय्यक जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी श्री.कर्णेवार, सरकारी कामगार अधिकारी राजू गुल्हाणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांचे कार्य फार महान आहे. दैनंदीन पुजनीय असे व्यक्तीमत्व असलेले शिवाजी महाराज प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची आणि शौर्याची आठवण प्रत्येकास व्हावी म्हणून शासन समुद्रात त्यांचा भव्य असा पुतळा उभारत आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे पालकमंत्री म्हणाले. यवतमाळातही महाराजांचा आश्वारूढ पुतळा असावा, अशी प्रत्येक यवतमाळकरवाशियांची इच्छा आहे. ही इच्छा लवकरच पुर्ण करू आणि महाराजांचा भव्य पुतळा उभारू असे पालकमंत्री यावेळी बोलतांना म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचेही भाषण झाले. त्यांनी महाराजांच्या जीवन कार्यावर यावेळी प्रकाश टाकला. सुरूवातीस पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे संचलन व आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिनल जगताप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 − four =