यवतमाळ – जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह आज पाच वाजतादरम्यान जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली. काही काही ठिकाणी गारपीट झाल्याने दाणादाण उडाली. पुसद, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, दिग्रस तालुक्यात सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे.
पांढरकवडा तालुक्याला एक तासपर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाºयासह गारपीट झाल्याने आंबा, निंबू, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. महागाव तालुक्यात ५.३० वाजतादरम्यान अवकाळी पावसाला सुरूवात झाली. विजांचा कडकडाट, वादळी वारा सुरू असताना गारपीटीला सुरूवात झाली. अवकाळीच्या तडाख्यात आमणी, अंबोडा, गीरगाव, बिजोरा आदी गावातील जनतेची तारांबळ उडाली. रस्त्यावरील वृक्ष उन्मळून पडली. तसेच वीज तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. दिग्रस तालुक्यात डेहणी, माळहिवरा, कलगाव येथे नुकसान झाल्याची माहिती आहे.










