
१०० घराची पडझड, पिकाचेही नुकसान
यवतमाळ- गेल्या ुआठवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलाचा आज रविवारी जिल्ह्याला परिणाम भोगावा लागला. जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाºयासह झालेल्या गारपिटीने गहू, हरभºयाच्या पिकासह फळबागांचेही अतोनात नुकसान झाले. आधीच जिल्ह्याची आणेवारी ५० पैशाच्या आत असताना उन्हाळी हंगामावर मदार उरलेल्या शेतकºयांची स्थिती या नैसर्गिक आपत्तीमुळे अर्धमेली झाली आहे.
आज दुपारी वादळीवाºयासह गारपीटीने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. आर्णी, दिग्रस, नेर, पुसद, कळंब, वणी, दारव्हा तालुक्यातील गहू, हरभरा, संत्रा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोसाट्यासह आलेल्या वादळासोबतच गारपीटीने हजारो हेक्टरवरील गहू, हरभºयांची धूळधाण लावली. मोजक्या प्रमाणात का होईना, कशाबश्या तग धरून असलेल्या संत्रा, मोसंबी, पपईच्या फळबागांचीही हानी झाली. आर्णी तालुक्यातील अनेक घरांवरील टिनपत्रे वादळात एखाद्या पृष्ठाप्रमाणे उडून गेली. अनेक गावातील विज पुरवठा खंडित झाला तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प पडली. शहरातील अनेक भागात गारांचे ढिग साचले होते. वादळात नगरपरिषदेचा लोखंडी दरवाजाही उन्मळून पडला. सेवानगर, पोलीस स्टेशन परिसर, मालाणीनगर, आमणी रोड, हैजरीवंगना परिसर आदी भागातील नागरिकांचा संसार काही वेळाच्या वादळामुळे उघड्यावर आला. तर तालुक्यातील पोडवण, देऊरवाडी(बुटले), टेंडुळी, अंतरगाव, चिखली, पाठोडा येथेही गारपीटीसह वादळी पावसाने नुकसान झाले. दिग्रस तालुक्यालाही गारपीटीचा त्रास भोगावा लागला. यात शहरासह, तुपटाकळी, वाईमेंढी, चिचपात्र, बेलोरा या गावात आवळ््याच्या आकाराच्या गारा पडल्या. ग्रामीण भागात सतत १५ मिनिटापर्यंत गारपिट झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नेर तालुक्यामध्येही ११ गावातील पिके भूईसपाट झाली असून लाखोंरुपयाचा फटका शेतकºयांना बसला आहे. काही ठिकाणी जनावरांना इजा होवून घरांची पडझड झाली आहे. दुपारी ३.१३ ते ४.३० वाजेपर्यंत वादळी पावसाने तालुक्यात तांडव माजविले. वणी तालुक्यातील उकणी, भालर, लागी, निवासी, निलजई, पुनवट आदी गावात शेतीपिकांसह घरांचे नुकसान झाले. पुसद तालुक्यासह कळंब, दारव्हा तालुक्यालाही वादळाचा सामना करावा लागला.









