यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा पहिला बळी

4837138604525446090_Mid
यवतमाळ , दि. ३० – जिल्ह्यासह तालुक्यात थंडीचा कडाका कायम असून थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीच्या प्रकोपाने शेतात जागलीसाठी गेलेल्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. प्रल्हाद सिताराम महल्ले (७०) रा. दगड धानोरा असे मृतकाचे नाव आहे.
वातावरणात बदल झाला असून पारा खाली उतरला असून तालुक्यात थंडीने हुडहुडी भरली आहे. थंडीच्या लाटेमुळे दिवसाची सुरुवात सकाळी उशिराने होऊ लागली आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज १४ अंश सेल्सियेस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. प्रल्हाद महल्ले हे दगड धानोरा येथील गजेंद्र टापरे याच्या शेतात पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून सोमवारी रात्री जागलीसाठी गेले होते. दरम्यान रात्रीच्यावेळी थंडीची हुडहुडी भरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी शेतकरी टापरे हे शेतात गेले असता हा प्रकार उजेडात आला. यावेळी गावकºयांनी शेतात एकाच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच नेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


1 × five =