
यवतमाळ, दि. १ – वादळी वाºयासह शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून दाणादाण उडविली. अवकाळी पावसाचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्यजनतेला बसला आहे. बाभूळगाव तालुक्यात वीज तारा तुटल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. दाभा (पहूर) परिसरात गारपीट झाल्याने गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. दिग्रस, नेर, राळेगाव, महागाव, उमरखेड यासह इतर तालुक्यालाही अवकाळीचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, सर्वेक्षण करण्याचे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यात कालदुपासून पाऊस सुरू असून, २०.४३ मिमी एवढी नोंद प्रशासनाकडून करण्यात आली. सर्वाधिक पाऊस यवतमाळ तालुक्यात ५३.८ मिमी झाला. बाभूळगाव ४० मिमी, राळेगाव १८ मिमी, कळंब १४ मिमी, पांढरकवडा १८.५मिमी , घाटंजी १७ मिमी, आर्णी २८ मिमी, महागाव ११मिमी, उमरखेड २१ मिमी, दिग्रस ३१ मिमी, पुसद ८ मिमी, दारव्हा ३३ मिमी, नेर २९ मिमी, झरी १ मिमी, मारेगाव ४ मिमी अशी नोंद करण्यात आली आहे.









