यावर्षी १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका

MNAIMAGE53664elevoting
मुंबई – यंदाच्या वर्षात संपूर्ण राज्यातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी दिली.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसोबत या वर्षात नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका, आठ नगर परिषदांच्या निवडणुका, १३९ नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायत, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा आणि १५ पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत तसेच ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूकही होणार आहे.
राज्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या ५० हून अधिक टक्के निवडणुका एक दिवसात होणार असतील तर त्या तालुक्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येतील असेही सहारिया यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight − 4 =