युवकाची आत्महत्या, चिठ्ठीचे गुढ कायम

घाटंजी  –  शहरातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यावेळी युवकाच्या खिशात चिठ्ठी सापडली असून आत्महत्येचे गुढ कायम आहे.
राहुल अशोक भोयर (३० ) रा. घाटंजी असे मृतकाचे नाव असून तो रसिक इलेक्ट्रीक दुकानामध्ये नोकरी करीत होता. २५ मार्च रोजी रात्री दुकान बंद करुन तो घरी गेला. त्यानंतर अंगणात येऊन मोबाईलवर बोलतांनाही नागरिकांनी पाहिले होते. दरम्यान रात्रीच्यावेळी राहुलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही बाब उजेडात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी मृतकाच्या शिखातून एक चिठ्ठी सापडली असून त्यामधील मजकुर कळु शकला नाही. त्यामुळे या युवकाच्या मृत्यूचे गुढ अजुनही कायम आहे. राहुल हा अविवाहीत असून त्याच्या वडीलानेही पाच वर्षापूूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास ठाणेदार कुरळकर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 − four =