रविशंकर यांची मोदींवर स्तुतीसुमने

download (2)
बेंगळुरू – ‘चांगली अर्थव्यवस्था आणि चांगले राजकारण यांना सांधणारा एकमेव दुवा म्हणजे चांगले प्रशासन हाच आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार ते सिद्ध करून दाखवेल,’ अशी आशा राज्यसभेतील विरोधी पक्ष उपनेते रविशंकर प्रसाद यांनी येथे व्यक्त केले.
‘सेंटर फॉर एंटरप्रेन्युअल एक्सलन्स’ या संस्थेच्या वतीने आयोजित ‘आयडिया एक्स्चेंज फोरम’मध्ये रविशंकर प्रसाद बोलत होते. भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.’आपण उद्योजकतेविषयी बोलता, धोरणात्मक पुढाकाराविषयी बोलता… नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही आपल्याला वाढीची चांगली संधी देण्याचे आश्वासन देतो. आपण देशातील मंदी, निराश वातावरणाविषयी बोलता पण भाजपशासित राज्यांचा विकासदर १० टक्क्यांहून अधिक असताना देशात मात्र असे वातावरण का आणि कसे आहे?’ उद्योजकांना पोषक वातावरण निर्माण करण्याची ग्वाहीही प्रसाद यांनी दिली. भारतासारख्या देशाचा पंतप्रधान लोकप्रिय नेताच असला पाहिजे. त्याने योग्य आणि ठाम निर्णय घेतले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 × = forty eight