राजीव हत्या: खुन्यांच्या सुटकेला स्टे

नवी दिल्ली – राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवा, अशी नोटीस न्यायालयाने जयललिता सरकारला बजावली आहे.
दया याचिकेवर निर्णयास विलंब झाल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राजीव हत्याकांडातील तीन दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. या निर्णयानंतर जयललिता सरकारने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तिघा मारेकऱ्यांसह आणखी एकाची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिले होते. मुख्य न्यायमूर्ती पी. सथासिवम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे आज (गुरुवारी) त्यावर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने तामिळनाडू सरकारला नोटीस बजावली. याप्रकरणी पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 + four =