
यवतमाळ , दि. १०(विशेष प्रतिनिधी) – राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज दिनांक 10 डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्हयातील झरी (जामणी) व केळापूर या आदिवासी बहुल तालुक्यातील दुभाटी (पौड), शिबला आणि गोपाळपूर या गावांना भेटी देवुन आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद सर्वप्रथम राज्यपालांचे आगमन झरी (जामणी) तालुक्यातील दुभाटी (पोड) येथे झाले. यावेळी जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी गोंडी नृत्य सादर करुन राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी अंगणवाडीची पाहणी करुन अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थी विद्यार्थ्यांबाबत व त्यांना मिळणा-या आहाराबाबत माहिती जाणून घेतली. राज्यपालांचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राजभवनाचे उपसचिव परीमलसिंग आ. संजीवरेडडी बोदकुरवार जिल्हाधिकारी, राहुल रंजन महिवाल, पोलिस अधीक्षक संजय दराडे, दुभाटी (पोड) सरपंच जानू धडांजे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
वनहक्क पटटयाचा लाभ मिळालेल्या काही लाभार्थ्यांशी राज्यपालांनी चर्चा केली. वन हक्काबाबत आपणास माहिती आहे काय असे राज्यपालांनी लाभार्थ्यांना विचारले असता आपण वनातून तेंदूपाने, मध, डिंक तसेच इतर गौण वनोपज गोळा करुन त्याच्या विक्रीतून आपला उदरनिर्वाह करीत
असल्याने लाभार्थ्यांनी राज्यपालांना सांगितले. शेतात कोणती पिके घेता आणि सिंचनाची सुविधा आहे काय असा प्रश्न राज्यपालांनी लाभार्थ्यांना केला असता आम्हाला जर सिंचनाची व विजेची सुविधा उपलब्ध झाली तर बारमाही पिके घेणे शक्य होईल असेही लाभार्थ्यांनी राज्यपालांना सांगितले. दुभाटी (पोड) हे गांव जंगल परिसरात असल्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्यातून आणि श्रमातून गावशेजारच्या परिसरात छोटया तलावांची निर्मिती करावी. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास व शेतीला सिंचनाची व्यवस्था करता येणे शक्य असून शासन आपणास योग्य ती मदत करणार आहे. असेही राज्यपालांनी लाभार्थ्यांना व ग्रामस्थांना सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणा-या ऑईल इंजिनचे वाटप पोतू लखमा आत्राम या लाभार्थ्याला करण्यात आले. दुभाटी (पोड) व परिसरातील ग्रामस्थांची बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थिती होती. शिबला येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिली. यावेळी राज्यपालांनी आश्रमशाळेतील संगणक कक्षाची पाहणी केली. इयत्ता 9 वीतील रोनीत तोडसाम या विद्यार्थ्यांने संगणक हाताळण्या बाबतची माहिती दिली. इयत्ता 12 वी (विज्ञान) मध्ये शिक्षण घेणा-या संतोषी चंदनकर या विद्याथींनीला शिक्षण घेऊन भविष्यात काय व्हायचे आहे असे राज्यपालांनी विचारले असता तीने केमिकल इंजिनिअर होणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिप प्रज्वलन केले. मुलींनी स्वागत गीत गाऊन आदिवासी यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमलसिंग, आ. राजू तोडसाम आ. संजीवरेडडी बोदकुरवार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रुमाले प्रामुख्याने उपस्थित होते.









