राज्यसरकारने घेतले दाभडीला दत्तक

download (1)
ना. हंसराज अहीर यांची माहिती
आर्णी,दि. १५ – लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशातील शेतकºयांशी चर्चा केली होती. या घटनेला २० मार्च रोजी एक वर्षपूर्ण होत आहे. दाभडीत घडलेल्या शेतकरी आत्महत्येमुळे सरकार अस्वस्थ झाले आहे. गावचा व शेतकºयांचा सर्वांगिन विकास करण्यासाठी राज्य सरकारने दाभडीला दत्तक घेतले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभडीत ‘चाय पे चर्चा’ केली होती. त्याच गावात शेतकरी आत्महत्या करीत असल्याने सर्वांचे लक्ष दाभडीकडे वेधले आहे. २० मार्च रोजी काँग्रेसचे नेते दाभडी येथे येवून आंदोलन करणार आहे. याकडे ना. अहीर यांचे लक्ष वेधले असता म्हणाले की, काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यांना आताच हे का आठवले असा प्रश्न ना. अहीर यांनी उपस्थित केला. आंदोलन करणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. या गावचा विकास करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या वतीने दाभडी गाव दत्तक घेतल्याची घोषणा करीत असल्याचे सांगितले.
जुन्या भूमिअधिग्रहण कायद्यापेक्षा नवीन कायदा अधिक चांगला आहे. शेतकºयांच्या हितासाठी असलेला कायदा मंजूर व्हावा म्हणून जीवाचे रान करू असेही ना. अहीर म्हणाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ना. अहीर यांनी केली. आज दुपारी जवळा, शेलू, किन्ही या गावात जावून शेतीची पाहणी करून शेतकºयांशी संवाद साधला. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी सरकार कायमस्वरूपी उपाययोजना करीत असल्याचे सांगितले. यावेळी आ. प्रा. राजू तोडसाम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजू डांगे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ eight = 15