
मुंबई- राज्यातील दुस-या टप्प्यात होत असलेल्या १९ लोकसभा मतदार संघात सरासरी ६१. ७१ टक्के मतदान झाले. यात सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदार संघात ६८ टक्के तर सर्वात कमी मतदान सोलापूर आणि साताऱ्यामध्ये ५७ टक्के झाले आहे. काही तुरळक घटना वगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झाले. २००९ साली झालेल्या निवडणूकीत याच मतदार संघात सरासरी ५४. १४ मतदान झाले होते. त्यात यावर्षी जवळपास सहा टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी हिंगोली – ५८.३३ टक्के, परभणी – ५५.२१ टक्के, उस्मानाबाद – ५५.६१ टक्के, लातूर – ५८ टक्के, शिरुर – ५३.१० टक्के , मावळ – ५०.६५ टक्के, माढा – ५२ टक्के , सांगली – ५६.९१ टक्के, सातारा – ५०.३२ टक्के मतदान, कोल्हापूर – ६२ टक्के मतदान , हातकणंगले – ६१ टक्के मतदान , शिर्डी – ५४.६० टक्के , अहमदनगर – ५५ टक्के मतदान , बीड – ५५ टक्के , रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ५३.६३ टक्के , सोलापूर – ४९ टक्के , नांदेड – ५५.३० टक्के , पुणे – ५१.२० टक्के , बारामती – ५०.५५ टक्के









