![]()
मुंबई-(महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,सतिष राठोड)- राज्य सरकारने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचे निर्णय घेतले असुन,केंद्र सरकारने या स्मारकाला मंजुरी दिली अाहे.नरीमन पाॅईंट येथून समुद्रात सुमारे २.५ कि.मी अंतरावर शिवरायांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार अाहे,२०१९ मध्ये या स्मारकाचे काम पूर्ण होईल असा अंदाज अाहे.व हे स्मारक मुंबईच्या पर्यटन दृष्टीकोनातून प्रमुख अाकर्षण ठरणार असुन,स्मारक तयार झाल्यावर दररोज सुमारे १०,००० पर्यटक स्मारकाला भेट देतील.या स्मारकाला अभैद्य सुरक्षा कवच देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
२६/११ च्या हल्ल्यात दहशतवादी समुद्र मार्गाने भारतात अाले होते,या पार्श्वभूमीवर शिव स्मारकात कोणतीही उणीव राहू नये म्हणून सरकारचे याकडे लक्ष राहील.स्मारकात सीसी टीव्ही कॅमेरा तसेच सुरक्षा दलांना दहशतवाद्यांना कडेकोट उत्तर देता यावे,यासाठी बंकरेही असतील.एनएसजी ची तुकडीही शिव स्मारकाच्या रक्षणासाठी तैनात असेल.तटरक्षक दल,मुंबई पोलीसही या स्मारकाच्या रक्षणासाठी सज्ज असतील.सर्वात महत्वाचे म्हणजे स्मारकात अॅंटी रडार सिस्टम असेल,यामुळे कोणत्याही रडारवर स्मारक दिसू शकणार नाही.हे स्मारक १६ हेक्टरच्या जागेत बांधण्यात येणार असुन स्मारकाची उंची १९० फूट व स्मारक बांधण्यासाठी १९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित अाहे.त्यामुळे हा स्मारक सर्वदृष्ट्या प्रेक्षणिय असणार अाहे.









