
यवतमाळ, दि. ८ (प्रतिनिधी) – राज्यावर दुष्काळाची गडद छाया असून, नापिकीमूळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्कारीत आहे. मात्र शासनाकडून अद्यापही ठोस उपययोजना करण्यात आलेल्या नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वात आज हवा सोडा आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या वाहनासह अन्य वाहनांची हवा सोडण्यात आली.
भाजप शिवसेना विरोधात असताना, शेतकºयांच्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावर उतरत होती. आता सत्तेवर बसून, एक महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र शेतकºयांच्या समस्या, प्रश्न निकाली काढण्यात सत्ताधारी उदासीन धोरण अवलंबित आहे. सत्तेची हवा यांच्या डोक्यात महिन्यातच शिरली असून, शेतकºयांना न्याय देण्यासाठी व सरकारच्या डोक्यातील हवा काढण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्टÑवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले. यावेळी दुष्काळी भागातील शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई, सहा महिन्यापर्यंत वीज बिल वसूली थांबवावी, आत्महत्या व दुष्काळग्रस्त शेतकºयांना १० लाख रूपये शासकीय मदत द्यावी, रोहयोच्या कामावर भर देण्यात यावी, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात याव्या यासह अन्य मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवासी उपजिल्हाधिकाºयामार्फत पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, रायूकाँचे जिल्हाध्यक्ष आशीष मानकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमूख, वसंत घुईखेडकर, पप्पू गांवडे, राहुल कानारकर, करीम खान, प्रशांत किर्दक, दिनेश गिरी, शाम सोळंकी, महेश गवई आदी उपस्थित होते.









