
ठाणे, (सतिष राठोड)
बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी राष्ट्रीय सामाजिक संघटना, राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेचा ५ वा वर्धापन दिन सोहळा २५ मार्च रोजी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशात साजरा करण्यात आला असून त्याचबरोबर १८ मार्च रोजी गोर बंजारा संविधानिक हक्क महासमितीच्या वतीने झालेल्या मोर्चाचे सरकारने उत्तर न दिल्यामुळे राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून बंजारा समाजाच्या अनेक मागण्यांचा समावेश निवेदनात केले आहे, जर सरकारने बंजारा समाजाच्या मागण्यांचा विचार येत्या १५ दिवसात केला नाही तर राष्ट्रीय बंजारा टायगर्स
या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर रास्ता रोको,तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची असेल असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आत्मारामजी जाधव यांनी केले आहे.अशी माहिती राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे, कल्याण तालुका अध्यक्ष सतिष राठोड यांनी डाॅ. अश्विनी जोशी,जिल्हाधिकारी ठाणे,यांना निवेदनाद्वारे दिली असुन बंजारा समाजाच्या मागण्यांविषयी १५ दिवसात विचार केला नाही तर तीव्र आंदोलन रा.बंजारा टायगर्सच्या वतीने छेडण्यात येईल. निवेदन देतांना डाॅ.अरविंद पवार,डाॅ.बी.आर.राठोड,कृष्णा चव्हाण,विनोद राठोड, बालाजी चव्हाण आदि पदाधिकारी उपस्थित होते.









