राष्ट्रीय स्तरावर ‘आप’चा प्रभाव नाही

images
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा फारसा प्रभाव पडणार नाही असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने मोठे यश मिळवले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही. दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर ‘आप’ने सरकार स्थापन केले होते. मात्र त्यांना त्यांनी राजीनामा दिला. दिल्लीत सत्तेत आल्यानंतर जी आश्वासने त्यांनी दिली होती, ती त्यांना पूर्ण करता आली नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
सरकार स्थापन करणे ही वेगळी जबाबदारी आहे आणि दिल्लीत सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी जबाबदारीपासून पळ काढल्याचे ते म्हणाले. तसेच दिल्लीत सत्तेत असताना ‘आप’ने काहीच काम केले नसल्याची टीका त्यांनी केली.त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत ‘आप’चा फारसा प्रभाव पडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ six = 10