रिपाइं (ए) जिल्हा बैठक संपन्न

3740_rpi-logo
यवतमाळ – रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) ची २४ नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन येथे जिल्हा कार्यकारीणीची सभा घेण्यात आली.  राष्टÑीय अध्यक्ष   मा. खा. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वात  जवखेडा हत्याकांडाचा निषेध मोर्चाचे आयोजन २८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे केले आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जाण्या संबंधी नियोजन केले असून मोर्चात कार्यकर्त्यांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांनी केले. या बैठकीमध्ये स्व. शाहू चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आली. पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला रामदास बनकर, अ‍ॅड. रवींद्र अलोणे, अ‍ॅड. धनंजय मानकर, नवनीत महाजन, धम्मपाल माने, सुरेश जाधव, महादेव घरडे, बन्सोड, वसुर्केत पाटील, कविता पाटील, सुलोचना भोयर, शुभांगी घरडे, राज ढवळे, गोविंद मेश्राम, विलास कांबळे, संभाजी लोणारे, निलकंठ मेश्राम, प्रफुल्ल इंगोले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 2 = three