प्रदेशाध्यक्ष भुपेशजी थुलकर यांची माहिती
यवतमाळ – भाजपा-शिवसेना- रिपाई (आठवले) पक्षाच्या महायुतीसाठी राज्यात वातावरण पोषक असून लोकसभेच्या ३५ जागेवर महायुती विजय प्राप्त करेल,अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीयाचे (आठवले गट) प्र्रदेशाध्यक्ष भुपेशजी थुलकर यांनी दिली. येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
राज्यात कॉग्रेस-राष्टÑवादी कॉग्रेस बद्दल जनतेमध्ये प्रंचड रोष असून जनता महायूतीच्या बाजुने आहे.रिपाई चे राष्टÑीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात पुणे,सोलापूर,नांदेड,परभणी,गंगाखेड इत्यादी ठिकाणी जिल्हा दौरे आटोपून यवतमाळ जिल्हयात पक्ष संघटन वाढविण्यासाठी आपण आलो असल्याचे ते म्हणाले तसेच जिल्हाकार्यकारणीमध्ये फेरबदल करणार असल्याचे सांगितले.राज्यात रिपाई लोकसभेत ३ जागा लढविणार आहे.याकरीता पक्षाची लोणावळा येथे राज्यकार्यकारणीची बैठक ७ फेब्रुवारीला पार पडली.रिपाईने सुरवातीपासुनच ३ लोकसभा व १ राज्यसभेच्या जागेची मागणी महायुतीच्या बैठकीत केली आहे.यामध्ये भाजपाने प्रकाश जावडेकर यांची उमेदवारी रद्द करून रामदास आठवलेना राज्यसभेवर पाठविले.याबद्दल त्यांनी भाजपचे आभार मानले.आता लोकसभेत रिपाईला कल्याण,इशान्य मुंबई यापैकी एक,सातारा,पुणे,लातूर यापैकी एक व रामटेक वर्धा यापैकी एक अशा ३ लोकसभेच्या जागा पाहिजे यामध्ये भाजपाने १ तर शिवसेनेने २ जागा द्याव्या.अशी मागणी पुढील आठवड्यात होणाºया महायुतीच्या समन्वय बैठकीत करण्यात येणार असल्याचे थुलकर यांनी सांगितले. यावेळी सामाजीक कार्यकर्ते महेंद्र मानकर यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. या पत्रकार परिषदेला विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुधाकर तायडे, अनिल गोंडाने, नेरचे उपनगराध्यक्ष मोहन भोयर,नवनीत महाजन,धम्मपाल माने,राहुल तायडे उपस्थित होते.









