
यवतमाळ, दि. १५ – डोळ््यात मिरचीपूड टाकून ५० हजाराची रोकड पळविणाºया चोरट्यांच्या टोळीला चोविस तासाच्या आत मुद्देमालासह अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली. रोहित नरेश चव्हाण (२५) रा. भोसा रोड, देवानंद भिवनकर (२७) रा. कोळंबी, अर्जुन दुर्गे रा. यवतमाळ, लक्ष्मण लालसिंग राठोड (३२) रा. लोणीघाटाणा अशी चोरट्यांची नावे आहे.
पांढरी येथील कृषी केंद्र बंद करून विनोद रामराव लाखेकर (४३) रा. उमरसरा हे परत येत होते. दरम्यान चार चोरट्यांनी लाखेकर यांना रस्त्यात अडवून डोळ््यात मिरचीपूड फेकली. त्यांच्याजवळ असलेले मध्यवर्ती व स्टेट बँकेचे पासबुक, सातबारा, ५० हजार रुपये रोकड असलेली काळी बॅग असा ऐवज लुटला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेची पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे निर्देश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी तपासाची तक्रे फिरविली. लुटमार प्रकरणी रोहित चव्हाण, देवानंद भिवनकर, अर्जुन दुर्गे, लक्ष्मण राठोड या चार चोरट्यांनी ताब्यात घेवून विचारपूस केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर लुटमार केल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून काळ््या रंगाची बॅग, कागदपत्रे, रोख १८ हजार ४०० रुपये दोन मोटर सायकल असा एकूण ९८ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सपोनि कडू, विकास खडके, ओमप्रकाश यादव, सुनील खंडागळे, रुपेश पाली, प्रदीप नाईकवाडे, बबलू चव्हाण, ममता देवतळे, प्रदीप तांबेकर आदींनी केली आहे.









