लोकसभा दिवसभरासाठी तहकुब

loksbha
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी होणा-या संसदेच्या अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. मात्र तेलंगण आणि अन्य मुद्यावर सदस्यांनी गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले. तर राज्यसभेतही याच मुद्दयावरून सदस्यांनी गदारोळ केला.
त्याआधी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेल अशी आशा व्यक्त केली. १५व्या लोकसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून उपस्थित केल्या जाणा-या सर्व मुद्यांवर चर्चाकरण्यासाठी सरकारची तयारी असल्याचे डॉ.सिंग यांनी सांगितले.हे अधिवेशन २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून यात भ्रष्टाचारविरोधी सहा विधेयके सादर केली जाण्याची शक्यता आहे. तसेच जातीय हिंसाचारविरोधी विधेयक, तेलंगण विधेयक, व्हिसलब्लोअर संरक्षण विधेयक आणि महिला आरक्षण अशा महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 5 = three