लोकसभा निवडणूक ही कौटुंबिक समारंभ नव्हे – प्रियंका गांधी

87244
अमेठी – लोकसभा निवडणूक ही दोन विचारसरणीदरम्यानची लढाई असून कौटुंबिक समारंभ नाही, या शब्दात प्रियंका गांधी यांनी त्यांचे चुलत भाऊ वरुण गांधी यांना मंगळवारी फटकारले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी त्या अमेठीत आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वरुण गांधी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्याचा संदर्भ देत प्रियंका म्हणाल्या की, हा लढा दोन विचारसरणीचा असून माझा मुलगा असा वागला असता तरीही मी त्याला माफ केले नसते. वरुण गांधी हे आपला रस्ता भरकटले आहेत, त्यांना योग्य मार्ग तुम्हीच दाखवा. असे वक्तव्य प्रियंका गांधी यांनी एका प्रचारसभेदरम्यान केले होते. या वक्तव्याचा व्हीडिओ उघड झाल्याबद्दल आपण निराश झालो नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 + = sixteen