वखार महामंडळात साडेचार कोटींचा घोटाळा, तिघांवर गुन्हे दाखल

10470841_713158905424500_7402859359255764380_o
उमरखेड (यवतमाळ) , दि. २८ – वेगवेगळ््या लोकांकडून खरेदी केलेले सोयाबीन, हरभºयाचे एकूण १२ हजार ६१९ पोते धान्य स्थानिक वखार मंडळाच्या गोदामातून वखार मंडळाचे भाडे अदा न करताच परस्पर हलविल्या प्रकरणी पोलिसांनी केंद्र प्रमुख, परिवाहक आणि धान्य व्यापारी या तिघांविरुद्ध फसवणूक तथा अफरातफर प्रकरणी गुन्हे दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे धान्य स्थानिक वाशीम अर्बन को. आॅप. बँकेला कर्जापोटी तारण होते. चातारी येथील घाऊक धान्य खरेदीदार श्रीधर माने यांनी सन २०१३ ते २१ फेब्रुवारी २०१५ पर्यंत वेगवेगळ््या लोकांकडून सोयाबीन तथा हरभरा खरेदी करून एकंदर १२ हजार ६१९ पोते धान्य स्थानिक वखार मंडळाच्या गोदामात साठविले होते. या धान्याच्या तारण पावतीवर खरेदीदाराने कर्जापोटी लाखो रुपयांची उचल वाशीम अर्बन बँकेच्या स्थानिक शाखेतून उचल केली होती. कर्जापोटी उचल केलेल्या रकमेची परत फेड न करताच त्याचप्रमाणे वखार मंडळाच्या साठवणुकीचे भाडे न देताच धान्य गोदामातून वखार मंडळातील केंद्र प्रमुख रोडगे, परिवाहक नेरकर आणि धान्य व्यापारी श्रीधर माने यांना एकमेकांच्या संगनमताने परस्पर हलविले. ही बाब राज्य वखार मंडळाचे अमरावती विभागाचे व्यवस्थापक मिलिंद मंगल घन यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकाराची सविस्तर तक्रार उमरखेड पोलिसांत दिली. पोलिसांनी केंद्रप्रमुख परिवाहक आणि धान्य साठवणूक व्यापारी या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गोदामात साठविलेल्या धान्याची बाजार भावाने ४ कोटी २० लाख ३१ हजार ६१३ रुपये एवढी किंमत असून, उमरखेडच्या इतिहासातील मोठा धान्य घोटाळा असून, वखार मंडळाच्या विश्वासार्हतेवर या प्रकाराने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six − 4 =