यवतमाळ, दि. १७ – जिल्ह्यात समाजकल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या शासकीय वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांची हेळसांड सुरू आहे. समाजकल्याण विभागाच्या दुर्लक्षित धोरणामूळे विद्यार्थ्यांना नरकयातना भोगाव्या लागत असल्याचा आरोप करीत मनसेने समाजकल्याण अधिकारी यांना घेराव घालून संताप व्यक्त केला.
शासकीय वसतीगृहांच्या कागदोपत्री तपासण्या होत असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार चालवित आहे. याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, भोजन, राहण्याची व्यवस्था योग्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाटंजी येथील वसतीगृहाचा कारभार रामभरोसे असल्या सारखा असून, येथील कर्मचाºयांना केवळ विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर डल्ला मारण्यातच रस आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील कार्यवाही शुन्य आहे. त्यामुळे संतप्त मनसे पदाधिकाºयांनी समाजकल्याण विभागावर धडक देऊन अधिकाºयांना घेराव घातला. यावेळी पदाधिकारी वसतीगृहातील गैरप्रकाराचा पाढा वाचत असताना, अधिकारी कर्मचाºयांची बाजू मांडत होते. त्यामुळे पदाधिकारी व समाजकल्याण अधिकाºयामध्ये चांगलाच वाद रंगला. यावेळी वसतीगृहांची तपासणी करून दोषीविरुद्घ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष अनिल हमदापूरे, विकास पवार, देवा शिवरामवार, गजानन भालेकर,माधूरी ठाकरे, बबीता मेश्राम, पल्लवी ठाकरे आदी उपस्थित होते.









